<div id="MiddleColumn_internal"> <p style="text-align: justify; "><span>केरळ राज्यातील एक कृषी विद्यापीठ. या कृषी विद्यापीठाची स्थापना त्रिचूर येथे १ फेब्रुवारी १९७२ मध्ये झाली. विद्यापीठाची तीन घटक महाविद्यालये असून त्यांपैकी एक उद्यानविज्ञान विषयाचे आहे. विद्यापीठाचे मुख्य कार्यक्षेत्र त्रिचूरचे उपनगर मन्नूथी येथे व दुसरे केंद्र वेल्लायनी येथे आहे. विद्यापीठाच्या अखत्यारीत २१ संशोधनकेंद्रे आहेत. नजीकच्या भविष्यकाळात मूलभूत भौतिकशास्त्रे व मानव्यविद्या, मच्छीमारी आणि गृहविज्ञान या विषयांची महाविद्यालये सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. विद्यापीठाने सुरुवातीपासूनच त्रिसत्रीय परीक्षापद्धती अवलंबिली आहे.</span></p> <p style="text-align: justify; ">लेखक: सु. र. देशपांडे</p> <p style="text-align: justify; ">माहिती स्रोत: <a class="external-link ext-link-icon" href="https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand4/index.php/2014-11-14-05-00-39/2015-06-01-09-36-20/list/7672-2012-01-19-06-08-11" target="_blank" title="केरळ कृषि विद्यापीठ">मराठी विश्वकोश</a></p> </div>